google-site-verification: google1b5c694212bc0168.html स्वर्णिम पर्यटन : एप्रिल 2022

माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

वायनाड | Wayanad

पश्चिम घाटावर पसरलेले जैव-विविधतेने भरलेले 2132 चौ.किमीवर पसरलेले हे क्षेत्र, वायनाड हे केरळचे असे एक रम्य स्थळ आहे ज्याने आपला निसर्ग जपून ठेवला आहे. या भूमीतील कड्याकपारांमध्ये लपले आहेत सर्वात प्राचीन आदिवासी, नागरी वाऱ्यांपासून अनभिज्ञ असलेले. 




केरळमधील पहिला इतिहासपूर्व लेख एडक्कलच्या पायथ्याशी आणि अंबुकुथिमलाच्या भोवती मिळाला जो पुरावा आहे की येथील संस्कृतीची मूळे मध्यपाषाण काळापर्यंत जातात.  



विलक्षण सुंदर असा हा प्रदेश आपल्या उप-उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. वन्यप्रदेश, इतिहास आणि संस्कृती यांचे मीलन असे वायनाड भव्य दक्खन पठाराच्या दक्षिण टोकाला वसले आहे. 



वायनाड मधील प्रेक्षणीय स्थळे माहिती:-



चेंब्रा शिखर


वायनाडच्या दक्षिण भागातील मेप्पाडी जवळ साधारण 2100 मीटर उंचावर उन्नत असे चेंब्रा शिखर आहे. हे त्या भागातील सर्वात ऊत्तुंग असे गिरीशिखर असून या शिखारावर चढण्यासाठी आपले शारीरिक कौशल्य पणाला लावावे लागते. 




या चेंब्रा शिखरावर चढणे हा एक चित्तथरारक अनुभव आहे. या शिखराच्या एकेका थांब्यावर पोहोचतो, तसे वायनाडचे  विस्तृत सौंदर्य पाहावयास मिळते आणि हे दृष्य शिखरावर पोहोचताच अधिक व्यापक होते. या शिखरावर चढणे आणि परत खाली येणे यासाठी संपूर्ण एक दिवस लागतो. ज्यांना शिखरावर शिबिर करून रहावयाचे असेल त्यांना तर हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.


ज्यांना येथे शिबिर करून थांबायचे असेल त्यांना वायनाड येथील कलपेट्टा येथून ’जिल्हा पर्यटन विकास परिषद” अर्थात डिस्ट्रिक्ट टूरिझम प्रमोशन काउन्सिल यांची संमती घ्यावी लागते.




नीलिमला


नीलिमला हे वायनाड मधील दक्षिण-पूर्व भागात असून कलपेट्टा आणि सुलतान बाथरी या दोन्ही ठिकाणांहून तेथे जाता येते. ट्रेकिंगसाठी विविध मार्गांचे पर्याय उपलब्ध करुन देणारे नीलिमला हे ट्रेकरर्स डिलाईट अर्थात ट्रेकिंग करणार्यांठचे आनंदाचे ठिकाण ठरते. 




नीलिमलाच्या शिखरावरील दृष्य हे अत्यंत विहंगम आणि लुभावणारे असून जवळच असलेला मीनमुट्टी धबधबा आणि त्याच्या आसपासचा दरीचं खोल दृश्य इथं पाहावयास मिळतं.




मीनमुट्टी


नीलिमलापासून जवळच अत्यंत भव्य असा मीनमुट्टी धबधबा आहे. ऊटी आणि वायनाड यांना जोडणार्यास मुख्य रस्त्यावरून पुढे 2किमी ट्रेकिंग मार्गावरून येथे पोहोचता येते. 





वायनाड जिल्यातील हा सर्वात मोठा धबधबा आहे.साधारण 300 मीटर उंचीवरून तीन अवस्थांमध्ये पाणी खाली टाकणारा हा धबधबा खरोखर उत्सुकतेत भर घालतो. 



छेतालयम


वायनाडमधील पर्यटकांना आकर्षित करणारा आणखी एक धबधबा म्हणजे छेतालयम धबधबा.वायनाडच्या उत्तर भागातील सुलतान बाथरीच्या अगदी जवळच हा धबधबा आहे.




मीनेमुट्टीच्या तुलनेत हा धबधबा छोटा आहे. परंतु हा धबधबा आणि त्याच्या लगतचा परिसर हा ट्रेकिंग करणार्यां साठी आणि पक्षी निरिक्षकांसाटी आदर्श आहे.




पक्षीपाथालम


ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या अत्यंत घनदाट अशा जंगलात साधारण 1700 मीटर पेक्षा अधिक उंचावर पक्षीपाथालम वसलेले आहे. या भागात प्रामुख्याने मोठे खडक आढळतात ,पैकी काही तर खरोखरच प्रचंड महाकाय आहेत. 


येथील खोलवर असणार्या गुहा ह्या मोठ्या प्रमाणात असलेले विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या विशिष्ट प्रजाती यांचे आश्रयस्थान आहे.





पक्षीपाथालम हे मानंतवाडीच्या जवळ असून तीरूनेल्लीपासून सुरू होणार्याा जंगलातून 7 किमीअंतर ट्रेकिंगद्वारे पार केल्यानंतर या भागात पोहोचता येते. पक्षीपाथालम  येथे पोहोचण्यासाठी ( DFO- उत्तर वायनाड) घन –जंगल अधिकारी, उत्तर वायनाड यांची अनुमती घ्यावी लागते.



बनसुरा सागर धरण


बनसुरा सागर येथे असणार्या  धरणाची गणना भारतातील सर्वात मोठा मातीचा डॅम म्हणून केली जाते.वायनाड जिल्यातील दक्षिण –पश्चिम भागात हे धरण असून तो करलाड तलावाच्या अगदी जवळ आहे. 



बनसुरा सागर धरणाचा मुख्य परिसर हा बनसुरा शिखरावर जाण्यासाठी ट्रेकिंगचे सुरवातीचे ठिकाण आहे. येथील आकर्षक गोष्ट म्हणजे बेटांचा समूह होय,जो आजूबाजूच्या भूभागाला जलाशयाने जलमग्न करून वेढले असताना बनला आहे.



काय खरेदी कराल:-


वायनाड मधील मनोरम पेक्षणीय स्थळे, ध्वनी आणि सुगंधाचा आनंद घेताना  वायनाडमधील इतर विशेष गोष्टींची जसे की मसाले, कॉफ़ी, चहा, बांबू उत्पादने, मध आणि हर्बल उत्पादने यांची खरेदी देखील करू शकता.


**अतिशय महत्वाचे सूचना**


वायनाड व आसपासच्या क्षेत्रात फ़िरण्यासाठी कृपया वायनाड पर्यटन विभागाच्या संपर्कात रहावे.


कधी जाल:-


पावसाळा सोडून कधीही भेट देऊ शकता.शक्यतो सप्टेंबर ते मार्च या कालावधीत भेट


विमान सेवा:-


जवळचा विमानतळ: कोझिकोड



रेल्वे सेवा:-


जवळाचे रेल्वे स्थानक: कोझिकोड


मुख्य गावे आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासूनचे अंतर:


कलपेट्टा: कोझिकोड पासून 72 किमी

मानंतवाडी: थलसेरी पासून 80 किमी आणि कोझिकोड पासून 106 किमी

सुल्तान बाथरी: कोझिकोड पासून 97 किमी

वैत्तिरी: कोझिकोड पासून 60 किमी

रस्ता: कोझिकोड, कन्नूर, ऊटी (कलपेट्टा पासून 175 किमी) आणि मैसूर (कलपेट्टा पासून 140 किमी) यांच्याशी रस्त्याने उत्तम प्रकारे जोडलेला आहे.



रस्ता सेवा:-


कोझिकोड,उटी,कूर्ग,वैतिरी, म्हैसूर येथून नियमित बस सेवा, टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत.





**अधिक माहितीसाठी खालील अधिकृत संकेतस्थळ संपर्क साधावा.



पत्ता,

जनरल सेक्रेटरी

वायनाड टुरिझम ऑरगनायझेशन(वायनाड पर्यटन विभाग)

वसुदेव एडोम,पोझुठाणा पीऒ

वायनाड, केरळ, भारत

पिन - 673575

दूरध्वनी. + 91 4936 255308, फ़ॅक्स. + 91 4936 227341

ई-मेल : mail@wayanad.org


                     

 Department of Tourism,

Government of Kerala,

Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033

Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.   

Tourist Information toll free No:1-800-425-4747

Tourist Alert Service No:9846300100

Email: info@keralatourism.org   

Photos



हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!



share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..



अस्वीकरण (Disclaimer ):


आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.




गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

महू | Mhow

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाला म्हणजे ‘महू’ला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. महू इथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. महू इथे बाबासाहेबांच्या जन्मस्थळावर शासनाने यथोचित स्मारक उभे केले आहे. हे स्मारक एक चैतन्याचा झरा आहे.




डॉ. आंबेडकर नगर जूने नाव: महू, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 

'महू' हे नाव इंग्रजी MHOW (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे भीम जन्मभूमी स्मारक आहे. 

  • सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महूचे नाम बदलून "डॉ. आंबेडकर नगर" असे ठेवले. 
  • येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले.
  • येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे.
  • भीम जन्मभूमी हे महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे स्मारक आहे. 
  • १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. 
  • या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली.
  • १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले. 
  • दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बुध्द अनुयायी व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात.


कधी जाल:-

वर्षभरात कधीही भेट देऊ शकता


कसे जाल:-

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून ४० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे.

विमान सेवा:-

जवळचे विमानतळ इंदोर आहे. जे भारतातील सर्व प्रमुख शहराशी जोडलेले आहे.

रेल्वे सेवा:-

जवळचे रेल्वे स्टेशन इंदोर असून भारतातील सर्व प्रमुख शहरातून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहेत.


रस्ता सेवा:-

इंदोर मधून महू साठी नियमित बस सेवा, टॅक्सी सुविधा उपलब्ध आहेत.



हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 

आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.





बुधवार, २७ एप्रिल, २०२२

गुरुवायूर | Guru Vayur

 

भारतातील केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे स्वरूप खूप बदलले आहे, जे अनेक शतके जुने आहे आणि केरळमध्ये सर्वात महत्वाचे आहे. 




हे गुरुवायूर मंदिर सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे मंदिर असून, येथे दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या मंदिरामध्ये भगवान गुरुवायुरप्पन यांची प्रतिष्ठापना केली गेली असून, भगवान गुरुवायुरप्पन, श्रीकृष्णाचे बालरूप म्हणून पूजले जातात. 





गुरुवायूर मंदिराला ‘भूलोका वैकुंठम्’ या नावाने ही ओळखले जात असून, भगवान विष्णूंचा वास असलेले धरतीवरील वैकुंठ असा या नावाचा अर्थ आहे.


केरळमधील गुरुवायूर मंदिर हे बालगोपाल श्रीकृष्णाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथे श्रीकृष्णाची गुरुवायुरप्पन रूपात पूजा केली जाते. मंदिरात भगवान विष्णूच्या दहा अवतारांचेही वर्णन आहे.




गुरुवायूर मंदिर संबंधित रंजक कथा:-


  • दर्शन फक्त हिंदूच करू शकतात
  • मंदिराचे देवता भगवान गुरुवायुरप्पन आहेत जे भगवान कृष्णाचे बालस्वरूप आहेत. 
  • या मंदिरात गैर-हिंदूंना प्रवेश दिला जात नसला तरी अनेक धर्मांचे अनुयायी हे भगवान गुरुवायुरप्पनचे निस्सीम भक्त आहेत.



मंदिराशी संबंधित आख्यायिका :-


या मंदिरात स्थापन झालेली मूर्ती द्वारकेची आहे. एकदा द्वारकेत भीषण पूर आला तेव्हा ही मूर्ती वाहून गेली. देव गुरु बृहस्पति देवाची ही मूर्ती प्राप्त झाली. वाऱ्याच्या सहाय्याने त्यांनी ही मूर्ती योग्य ठिकाणी आणली. वायू आणि बृहस्पति या मूर्तीच्या स्थापनेसाठी योग्य जागा शोधत होते, तेव्हा ते केरळला पोहोचले. तिथे त्यांनी महादेव आणि माता पार्वतीचे दर्शन घेतले. 



महादेवाच्या सांगण्यावरून बृहस्पति आणि वायुने त्या मूर्तीची स्थापना केली. गुरु आणि वायु यांच्या नावावरून या मंदिराला गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर असे नाव देण्यात आले. 



कला आणि साहित्याशी असलेले नाते:-


या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर केवळ धार्मिक विधी आणि उपासनेशी संबंधित नाही तर कला आणि साहित्याशीही संबंधित आहे.


हे मंदिर विद्या कृष्णनट्टम कालीचे मुख्य केंद्र आहे, जे नाट्य-नृत्य कलेचा एक प्रकार आहे, ज्याने कथकली या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकाराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 


गुरुवायूर मंदिर प्रशासन गुरुवायूर देवस्वोम नावाची कृष्णत्तम संस्था चालवते. याव्यतिरिक्त, गुरुवायूर मंदिर हे दोन प्रसिद्ध साहित्यकृतींशी संबंधित आहे, नारायणियमचे लेखक मेलपत्तूर नारायण भट्टाथिरी आणि ज्ञानप्पानाचे लेखक पुंथनम, हे दोघेही गुरुवायुरप्पनचे महान भक्त होते. 



दर्शनाचे नियम:-


  • मंदिरात प्रवेश करण्यासाठी पारंपरिक पोशाख परिधान करावा लागतो.
  • पुरुषांनी लुंगी नेसून आणि छाती उघडी ठेवून दर्शन घ्यावे असा नियम आहे. तर स्त्रियांनी साडी परिधान करून दर्शन घ्यावे असा नियम आहे.
  • मुलींनी सलवार कमीज, किंवा परकर व लांब हातचे ब्लाउज परिधान करून दर्शन घेतले तरी चालते. परंतु नियमानुसार पारंपरिक पोशाख प्राधान्यक्रम आहे.


 दर्शन वेळ:


  • पहाटे सकाळी तीन वाजलेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत.
  • संध्याकाळी साडे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असते.
  •  दर्शनासाठी खूप गर्दी असते त्यामुळे भाविकांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच भजन, आरती, पारंपरिक नृत्य, गाणी यांचे कार्यक्रम सुरु असतात जेणेकरून रांगेत कंटाळा येणार नाही.



गुरु वायुर मधील इतर काही प्रेक्षणीय स्थळे:-


ममयुर मंदिर, चामुंदेश्वरी मंदिर, पार्थ सारथी मंदिर, चावकाड बीच, इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.



कधी जाल:-

धार्मिक स्थळ असल्याने संपूर्ण वर्षभरात कधीही भेट देऊ शकता. तरीही हिवाळा हा भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.


कसे जाल:-


रेल्वे सेवा:-


त्रिशूर स्टेशन दक्षिण रेल्वे कोची हार्बर टर्मिनस-पौरनूर जंक्शन रेल्वेमार्ग आणि एर्नाकुलम जंक्शनपासून 75 किमी अंतरावर आहे. गुरुवायूर मंदिर येथून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे.

एर्नाकुलम जंक्शन 85 किमी अंतरावर आहे


विमान सेवा:-


कोचीन विमानतळ आणि कालिकत विमानतळ शहरापासून अवघ्या 80 किमी अंतरावर आहेत.


रस्ता सेवा:-


त्रिवेंद्रम, कोचीन,कालिकत, बेंगलोर, चेन्नई, इत्यादी शहरातून नियमित बस सेवा उपलब्ध आहेत





हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!


share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..



अस्वीकरण (Disclaimer ):



आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



सोमवार, २५ एप्रिल, २०२२

सबरीमाला | Sabrimala

 सबरीमाला हे शैव, शक्ती, वैष्णव आणि इतर परंपरांचा संगम आहे. मल्याळममध्ये 'सबरीमाला' म्हणजे 'पर्वत'. सबरीमालाच्या आजूबाजूच्या प्रत्येक टेकडीवर काही ना काही मंदिर आहे, जे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात.



सबरीमाला हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. सबरीमाला मंदिर केरळ राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेल्या पठाणमथिट्टा जिल्ह्यात आहे. 





केरळची राजधानी तिरुवनंतपुरमपासून १७५ किमी अंतरावर पंपा नावाचे ठिकाण आहे. पंपा ते सबरीमाला असा पायी प्रवास करावा लागतो. हा मार्ग पाच किलोमीटर लांबीचा आहे. हे मंदिर हिंदू ब्रह्मचारी देवता अय्यप्पन यांना समर्पित आहे. 



सबरीमाला मंदिराचा इतिहास 


भगवान अयप्पा हे भगवान शंकर आणि मोहिनी यांचे पुत्र मानले जातात. भगवान विष्णूला हरि आणि शिवाला हर म्हणतात, म्हणून भगवान अयप्पा यांना हरिहर असेही म्हणतात.


सबरीमाला मंदिर हजारो वर्षांपूर्वी राजा राजशेखर यांनी बांधले होते. राजा राजशेखरने पंपा नदीच्या काठावर भगवान अय्यप्पा यांची बालस्वरूपात भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या महालात आणले. यानंतर, राणीने राजवाड्यात एका मुलाला जन्म दिला, परंतु राजा भगवान अयप्पाला आपला मुलगा मानत असल्याने, त्याला प्रथम राज्य अय्यप्पाकडे सोपवायचे होते. असे असताना राणीला हे मान्य नव्हते. आजारी असल्याचे भासवून राणीने अय्यप्पाला सिंहिणीचे दूध घेण्यासाठी जंगलात पाठवले. अय्यप्पाने जंगलात एका राक्षसाचा वध केला.त्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सिंहिणीला अय्यप्पासोबत महालात पाठवले. हे पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. जेव्हा वडिलांनी अयप्पाला राजा बनण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि राजवाड्यातून गायब झाला. खूप दिवसांनी भगवान अयप्पा आपल्या वडिलांना दर्शन दिले आणि त्यांना त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर राजा राजशेखर यांनी तेथे सबरीमाला मंदिर बांधले.



मंदिराची काही वैशिष्ट्ये:-


  • या मंदिरात जाण्यापूर्वी पंपा नदीत स्नान करावे लागते आणि नंतर दिवा लावून नदीत प्रवाहित केल्यानंतरच मंदिरात प्रवेश करावा लागतो.
  • साबरी माला मंदिर इतर मंदिरांप्रमाणे वर्षभर उघडत नाही. 
  • हे मंदिर केवळ नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भक्तांसाठी खुले असते, त्यानंतर ते बंद होते.
  • या मंदिरातील प्रत्येक पूजेत तुपाचा अभिषेक केला जातो. मंदिरात तूप घेऊन जाणारे सर्व भाविक एका खास भांड्यात जमा केले जातात आणि त्यानंतर भगवान अयप्पा यांना या तुपाचा अभिषेक केला जातो.
  • सबरीमाला मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे असे मंदिर आहे जिथे दरवर्षी दोन ते पाच कोटी लोक भेट देतात.
  • हे मंदिर 18 टेकड्यांमध्‍ये बांधले गेले आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर प्रत्येक टेकडीवर आहे.
  • सबरीमालाच्या 18 पायऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. यातील पहिल्या पाच पायऱ्या माणसाच्या पाच इंद्रियांचे, आठ पायऱ्या मानवी भावनांचे आणि तीन पायऱ्या मानवी गुणांचे, तर शेवटच्या दोन पायऱ्या ज्ञान आणि अज्ञानाचे प्रतीक आहेत.





सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी कठोर नियम - 



  1. हे मंदिर भारतातील इतर मंदिरांपेक्षा खूपच वेगळे आहे. या मंदिरात स्थापित भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते, त्यामुळे शतकानुशतके केवळ पुरुष भक्तच या मंदिरात दर्शनासाठी येतात. 
  2. सबरीमाला मंदिराचे नियमही इतर मंदिरांच्या तुलनेत अतिशय कडक आहेत, त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे लागते.
  3. सबरीमाला मंदिरात जाण्यासाठी भाविकांना ४१ दिवस उपवास करावा लागतो. मासिक पाळीमुळे महिलांना हे व्रत पूर्ण करता येत नसल्याने त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मात्र पुरुषांना हे व्रत पूर्ण करूनच मंदिरात यावे लागते.
  4. मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना 18 पवित्र पायऱ्या चढाव्या लागतात आणि या पायऱ्या केवळ तेच चढतात ज्यांनी 41 दिवसांचे कठोर उपवास पूर्ण केले आहेत.
  5. सबरीमाला मंदिराच्या 18 पायऱ्या चढताना भाविकांना पायऱ्यांजवळ तुपाने भरलेला नारळ फोडावा लागतो. नारळाचा एक तुकडा हवनकुंडात टाकला जातो तर दुसरा तुकडा भक्त प्रसाद म्हणून घेतात.
  6. सबरीमाला यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी निळे किंवा काळे कपडे घालावे लागतात. तो प्रवास संपेपर्यंत दाढी-मिशी काढू शकत नाही.
  7. सबरीमाला यात्रेदरम्यान प्रत्येक भक्ताला कपाळावर चंदनाची पेस्ट लावावी लागते.
  8. पंपा नदीत आंघोळ करून गणपतीची पूजा करून नंतर मंदिराकडे जावे लागते.
  9. या मंदिरात प्रवेश करताना भाविकांना तत् त्वम् असि मंत्राचा जप करावा लागतो. या मंत्राचा अर्थ असा आहे " तुम्ही आहात"



 महिलांना मंदिर प्रवेश निषिद्ध:-


केरळच्या सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदी आहे. सुमारे 800 वर्षे जुन्या या मंदिरात ही श्रद्धा प्रदीर्घ काळ चालत होती. भगवान अयप्पा अविवाहित असल्याचे मानले जाते आणि हिंदू धर्मात मासिक पाळीदरम्यान महिलांना 'अपवित्र' मानले जाते, ज्यामुळे त्यांना या मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. तथापि, 28 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या प्रवेशावरील बंदी असंवैधानिक आणि भेदभावपूर्ण घोषित केली. 2 जानेवारी 2019 रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रथमच पन्नास

वर्षाखालील दोन स्त्रियांनी या मंदीरात प्रवेश केला.



कसे जाल:-


सबरीमाला मंदिरात थेट पोहोचण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही. बसने पंपा नावाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सबरीमाला मंदिरापर्यंत चालत जावे लागते. मंदिराच्या आजूबाजूला डोंगर आणि पेरियार अभयारण्यामुळे रस्ता थोडा अवघड आहे. 


विमान सेवा:-

 

सबरीमाला जवळचे विमानतळ कोची आणि तिरुवनंतपुरम आहे. हे विमानतळ नवी दिल्ली, हैदराबाद, मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता यांना जोडलेले आहे. येथे पोहोचल्यानंतर, कोची विमानतळापासून 104 किमी अंतरावर असलेल्या पंपा बहूला बस किंवा ट्रेनने जाऊ शकता.


रस्ता सेवा:-


KSRTC ने सबरीमाला यात्रेकरूंच्या सुविधेसाठी पंपा ते कोईम्बतूर, पलानी आणि थेक्कडी अशी बससेवा सुरू केली आहे.पंपाला जाण्यासाठी बसेस तामिळनाडू आणि कर्नाटक सरकार चालवतात. 


रेल्वे सेवा:-


सबरीमालाचे सर्वात जवळचे स्टेशन चेंगन्नूर आणि कोट्टायम हे आहे. कोट्टायम, एर्नाकुलम किंवा चेंगन्नूर ला येऊन बसने पंपा येथे जाता येते. तेथून सबरीमालाला पायी जाऊ शकता.




हा लेख कसा वाटला कॉमेंट करुन जरुर कळवा....!!!

 

share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..


अस्वीकरण (Disclaimer ): 


आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.



शनिवार, २३ एप्रिल, २०२२

गुलबर्गा / कलबुर्गी | Gulburga/Kalburgi

 गुलबर्गा हे कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. हे शहर गुलबर्गा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुलबर्ग्यापासून हैद्राबाद सुमारे २०० कि.मी. तर बंगलोर दक्षिणेस ६२३ कि.मी. अंतरावर आहे.



गुलबर्गा हे एक ऐतिहासिक शहर असून, निझामाच्या हैद्राबाद प्रांताचा एक भाग होते. इ.स.च्या १४व्या शतकातील हसन गंगू बहामनी या मुस्लिम सुलतानाने स्थापलेल्या बहामनी सुलतानशाहीची राजधानी म्हणून हे शहर उदयास आले.


गुलबर्गा आणि त्याचा परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील श्रीक्षेत्र गाणगापूर हे नरसिंह सरस्वतींमुळे प्रसिद्धीस आले. गुलबर्गा शहरात कोरांटी हनुमानाचे मंदिर, लिंगायत समाजाचे शरण बसवेश्वर मंदिर आणि ख्वाजा बंदे नवाझ दर्गा प्रसिद्ध आहे. नव्याने बांधलेला बुद्ध विहार देखील गुलबर्ग्याचे धार्मिक महत्त्व वाढवतो.



गुलबर्गा मधील पर्यटन स्थळे माहिती:-


बुद्ध विहार 


बुद्ध विहार हे कर्नाटकातील गुलबर्गा येथे असलेले एक आध्यात्मिक केंद्र आणि बौद्ध मंदिर आहे. हे बौद्ध मंदिरे आणि उपचार केंद्रांच्या प्रतिष्ठित गटाचा भाग आहे.  



बुद्ध विहार हे बौद्धांचे उपासनेचे ठिकाण आहे आणि ते त्याच्या शांत स्वभावासाठी आणि उपासकांना देत असलेल्या निर्मळ शांततेसाठी प्रसिद्ध आहे.




हा बुद्ध विहार गुलबर्गा, कर्नाटक येथे स्थित आहे आणि 7 जानेवारी 2007 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली आहे. यात सुंदर कलात्मक रचना आहेत आणि त्यात एकत्रित केलेल्या वास्तुशिल्प पैलूंचे अनुकरणीय मिश्रण आहे. शिवाय सांची, सारनाथ, नागपूर आणि अजिंठा सारखी बौद्ध केंद्रे देखील त्याच प्रमाणात आणि त्याच प्रेरणा मॉडेलवर बनवली गेली.




स्वतःला नवसंजीवनी देण्यासाठी हे ठिकाण खूप चांगले केंद्र आहे.आजकालच्या धकाधकीच्या जीवनात असा निर्मळ परिसर मिळणे हा आनंद इतरत्र मिळत नाही. गुलबर्गा मधील हे ठिकाण एक उत्तम ठिकाण आहे.




बुद्ध विहार हे अग्रगण्य ठिकाणांपैकी एक आहे जिथे आपल्यातील अधिक चांगले शोधण्यासाठी, मेंदू आणि शरीराची कार्यप्रणाली आणि सर्व काही सजगतेकडे लक्ष देण्यासाठी योग्य ठिकाण आहे.


विहार भेट देण्यासाठी वेळ :-


 सकाळी 06:00 ते दुपारी 01:30 

संध्याकाळी 04:00 ते रात्री 08:00 


प्रवेश शुल्क

मोफत 


कसे जाल:-


कलबुर्गी रेल्वे स्टेशन किल्ल्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचे विमानतळ हैदराबाद आहे, कलबुर्गी जिल्ह्यापासून सुमारे 235 किलोमीटर अंतरावर आहे. 




सुफी फकीर ख्वाजा बंदे नवाज दर्गा



प्रसिद्ध सुफी फकीर ख्वाजा बंदे नवाज यांची कबर आहे. उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांच्या दहा हजारांहून अधिक पुस्तकांनी बनलेल्या विस्तीर्ण ग्रंथालयाचे घर, ही समाधी गुलबर्ग्याच्या सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. 





या इमारतीवर पर्शियन, इंडो-सारासेनिक आणि अरबी प्रभाव समाधीभोवती असलेल्या घुमट आणि बुरुजांवरून दिसून येतो. आजही हा दर्गा प्रदेशातील विविध धर्मांच्या एकतेचा दाखला म्हणून उभा आहे. लोकांचा असा विश्वास आहे की धर्माची पर्वा न करता समाधीवर पाऊल ठेवणाऱ्या प्रामाणिक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 


कधी जाल:- 


ऑक्टोबर ते फेब्रुवारी भेट देण्याचा उत्तम काळ.



कसे जाल:-


सर्वात जवळचे विमानतळ हैदराबाद येथे आहे. दर्गा गुलबर्गा रेल्वे स्टेशनपासून एक तासाच्या अंतरावर आहे. 



गुलबर्गा किल्ला 


कर्नाटकातील गुलबर्गा शहरात स्थित, हा किल्ला 14 व्या शतकाच्या मध्यात राजा गुलचंद यांच्या पाठिंब्याने बांधला गेला आणि बहामनी जिल्ह्याचा हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड आहे. तथापि, विजयनगरचा शासक कृष्णदेवरायाने किल्ला नष्ट केला. पण आदिल शाहने नंतर किल्ल्याची पुनर्बांधणी केली.



इराणची पर्शियन वास्तुकला गुलबर्गा किल्ल्याच्या स्थापत्यकलेला प्रेरणा देते. किल्ल्याची रचना स्पेनमधील कॉर्डोबाच्या ग्रेट मशिदीपासून प्रेरित आहे आणि त्यात विशिष्ट कमानदार दरवाजे आणि मूरिश स्थापत्य सौंदर्य आहे. 




किल्ल्याच्या आतील बागा, मशिदी, कमानी आणि राजवाडे, तसेच संपूर्ण गुलबर्गा शहरातील, दख्खनमध्ये विकसित झालेल्या इंडो-पर्शियन वास्तुशिल्प चमत्कारांबद्दल बोलतात. हे प्रामुख्याने 1347 मध्ये बहामनी राजवंशाच्या स्थापनेनंतर घडले.



 किल्ल्यातील आकर्षणे


  • किल्ल्यामध्ये काही प्राचीन मशिदी, इमारती, तबेले आणि मंदिरे आहेत. 
  • किल्ल्यात बुरुज आणि दारूगोळ्याच्या ढिगाऱ्यांसारख्या रचना आहेत. 
  • जामा मशीद आणि खवा बंदे नवाज यांची समाधी किल्ल्याच्या आवारात आहे 
  • त्याच्या बाजूला एक शांत तलाव आहे.
  • किल्ल्याच्या आत एक खजिना आहे ज्यामध्ये प्राचीन वस्तूंचा समावेश आहे 
  • किल्ला खूप मोठा आहे आणि सुमारे 38000 चौरस फूट क्षेत्रफळ आहे.



गुलबर्गा किल्ल्याची गॅलरी


किल्ल्यामध्ये सर्वात जास्त मागणी असलेल्या आणि बहुमोल कलाकृतींचा समावेश आहे.




जगातील सर्वात लांब तोफ - ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे की जगातील सर्वात लांब तोफ कर्नाटकातील गुलबर्गा किल्ल्याच्या परिसरात आहे. हे बहामनी सल्तनतच्या कारकिर्दीत स्थापित केले गेले होते आणि ते पूर्णपणे मिश्रधातूपासून बनलेले आहे (पंच धातू). तोफ बारा गाझी टोफ म्हणून ओळखली जाते आणि 29 फूट लांब, 2 फूट व्यास आणि 7 इंच जाडी आहे.


शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा साठवण गो डाऊन्स - हा किल्ल्यांचा सर्वात जास्त भेट दिलेल्या भागांपैकी एक आहे. बहामनी राजघराण्यातील लढायांमध्ये वापरलेली बहुतेक शस्त्रे आणि दारुगोळा किल्ल्यात जतन करण्यात आला आहे.


हत्ती आणि घोड्याचे तबेले - हे राजा गुलचंद आणि नंतर बहामनी जिल्ह्यातील राजांचे हत्ती आणि घोडे ठेवण्यासाठी वापरलेले ताबे आहेत.


मशिदी - प्रसिद्ध आकर्षण म्हणजे हफ्त-गुम्बाझ, सुलतान हसनचा मकबरा, फिरोज शाहची समाधी, सय्यद मोहम्मद गेसू दराज, प्रसिद्ध सुफी संत यांची समाधी, विशिष्ट इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेली, आणि भव्य जामा मजीद 



गुलबर्गा किल्ल्याभोवती प्रेक्षणीय स्थळ


ख्वाजा बंदे नवाज दर्गा - १४व्या शतकात, सुफी ख्वाजा बंदे नवाज यांनी भारतात इस्लामचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या नंतर ही मशीद बांधली गेली. हा दर्गा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो आणि जामा मशिदीव्यतिरिक्त गुलबर्गा किल्ल्याजवळील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.


जामा मशीद - ही दक्षिण भारतातील पहिल्या मशिदींपैकी एक आहे आणि गुलबर्गा किल्ल्याजवळील आणखी एक जास्त भेट दिलेली ठिकाणे आहे. ही मशीद गुलबर्गा ही बहामनी राजवटीची राजधानी म्हणून स्मरणार्थ बांधली गेली.



सन्नाटी 


भीमा नदीच्या काठी वसलेले एक छोटेसे गाव.





भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या भागात अनेक उत्खनन केले आहे.



अनेक टेराकोटाच्या वस्तू, शिल्पे आणि पाट्या सापडल्या आहेत. बौद्ध महास्तुपाच्या शोधासाठीही ते प्रसिद्ध आहे.




चंद्रलंब मंदिर 


हे एक सुंदर वनमंदिर आहे आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. गुलबर्गा किल्ल्याजवळ सर्वात जास्त भेट दिलेल्या 5 ठिकाणांपैकी हे एक आहे.



कधी जाल:-


जानेवारी-मार्च आणि नंतर ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान कधीही किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे. 


कसे जाल:-


विमान सेवा:-


गुलबर्गा शहरापासून सोलापूर हे जवळचे विमानतळ आहे. हे शहरापासून 81 किलोमीटर अंतरावर आहे. 


रेल्वे सेवा:-


हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यांसारखी प्रमुख शहरे गुलबर्ग्याशी रेल्वेनी चांगली जोडलेली आहेत. 


रस्ता सेवा:-


बंगलोर आणि म्हैसूर येथून तुम्ही नियमितपणे चालणाऱ्या बसने गुलबर्गा येथे पोहोचू शकता. गुलबर्ग्यापासून हैदराबाद सुमारे 200 किमी अंतरावर आहे.



शरणा बसवेश्वर मंदिर 


हे सभामंडप म्हणूनही ओळखले जाते, गुलबर्गा येथे आहे. हे संत बसवेश्वरांना समर्पित एक पवित्र स्थान आहे, ज्यांची ओळख एक शिक्षक, तत्वज्ञानी आणि प्रबुद्ध व्यक्ती म्हणून केली जाते ज्यांनी हिंदू धर्माच्या पंखाखाली समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले.



लिंगायत संत शरण बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात बांधलेले, हे मंदिर हिंदू दगडी कोरीव कामाचा एक अद्भुत नमुना आहे.



मंदिराची वास्तुकला

शरणा बसवेश्वर मंदिर विविध संस्कृतींचे अनुसरण करत असलेल्या सम्राटांच्या राजवटीचा परिणाम म्हणून हिंदू आणि मुघल प्रभावांचे संयोजन दर्शवणारे विदेशी वास्तुकला आहे.





आकर्षक आधारस्तंभ, 36 कमानी, सजावटीचे आरशाचे काम, शरणा बसवेश्वराच्या जीवनासारखी शिल्पे आणि अप्रतिम झुंबरे असलेले मंदिर, जटिल अलंकार देखील आहेत. या कोरीव कामांमध्ये गरुड (हिंदू पौराणिक पक्षी), पोपट, हत्ती, तसेच फुले यांसारख्या भव्य प्राण्यांचे चित्रण केले आहे.


**महत्त्वाचे**


शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट इत्यादी टाळून योग्य कपडे घाला.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शूज काढा.

आवारात छायाचित्रण करण्याची परवानगी नाही.



कधी जाल:-


संत शरणा बसवेश्वरांच्या पुण्यतिथी आणि जयंतींचे स्मरण करणार्‍या वार्षिक जत्रा आणि कार उत्सवासारख्या शुभ दिवसांना भेट देता येते. 



कसे जाल:-


शहराच्या कोणत्याही भागातून कॅब किंवा बस सेवा वापरून तसेच खाजगी वाहने भाड्याने घेऊन येथे पोहचता येते.



चंद्रमपल्ली धरण 


कर्नाटकात गुलबर्गा जिल्ह्यात आहे. भीमा नदीच्या पात्रावर (१९७३ दरम्यान) बांधण्यात आलेल्या प्राथमिक धरणांपैकी हे एक आहे.





धरण गोट्टम गोट्टा जंगलाच्या घनदाट आच्छादनांनी वेढलेले आहे. धरणावर एक बेट आहे जे विविध पर्यटक आणि अभ्यागतांना आकर्षित करते. धरण सुमारे 28.65 मीटर उंच आणि 926 मीटर लांब आहे. धरणाद्वारे जोडलेल्या दोन पर्वतांच्या सुंदर दृश्यासह शहराचे आल्हाददायक हवामान आहे. ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी हा प्रदेश एक आदर्श स्थान म्हणून उदयास आला आहे.


ट्रेकिंग आणि कॅम्पिंग हे या प्रदेशाचे आकर्षण म्हणून उदयास येण्याचे हे मुख्य कारण बनले आहे. हा ट्रेक नदीच्या सपाट किनार्‍याजवळ तसेच जंगलातील खडबडीत भूभागाजवळ केला जातो. 


कॅम्पिंग मुख्यतः धरणाजवळ असलेल्या बेटावर चालते. याशिवाय धरणाजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले जेवरगी हे धरणाजवळील एक सुंदर ठिकाण आहे. 


चंद्रपल्ली धरणाचा इतिहास


1973 मध्ये बांधण्यात आलेले हे धरण चिंचोली तालुक्यातील अनेक गावांना सिंचनाची सुविधा देत आहे. धरणाची व्याख्या लेफ्ट बँक स्पिलवेसह मातीचे धरण अशी केली जाते. हे सिंचन प्रकल्प म्हणून काम करण्यासाठी बांधण्यात आले असल्याने, त्याला एकल उद्देश धरण असे संबोधले जाते. धरणामध्ये 6 दरवाजे आहेत.



कसे जाल:-


सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गुलबर्गा येथे आहे. गुलबर्गा स्थानकावर बहुतांश गाड्या थांबतात, रेल्वे स्थानकावरूनही धरणापर्यंत पोहोचता येते.




जामा मशीद


ही दख्खनची वास्तुशिल्पीय अद्भुतता मानली जाते. रफी म्हणून ओळखल्या जाणार्‍या काझविन येथील एका पर्शियन वास्तुविशारदाने हे पवित्र स्थान बांधले असे म्हणतात. 

मुख्य वैशिष्टय़ म्हणजे अंगण नसलेली ही भारतातील दुर्मिळ मशीद आहे. त्यात एकही मिनार नाही. त्याऐवजी, इतर अनेक लहान घुमटांसह एक मोठा मध्यवर्ती घुमट बांधला आहे. संपूर्ण रचना छताने झाकलेली आहे ज्यामुळे ते पाहण्यास भव्य बनते. 




मशिदीच्या आत आणि बाहेर कमानदारांची किचकट व्यवस्था आहे. विशिष्ट बाह्य भाग हे दक्षिण पूर्व आशियातील प्रमुख आकर्षण बनवते. मशिदीचा दख्खन स्थापत्यकलेवर प्रभाव पडला आहे आणि तत्सम वैशिष्ट्ये नंतरच्या दख्खन काळातील ऐतिहासिक इमारतींमध्ये दिसून आली.



जामा मशीद गुलबर्गा चा इतिहास


बहमनी राजवंशाची स्थापना अल-अल-दीन हसन बहमन शाह यांनी केली, जो मुहम्मद बिन तुघलकच्या दरबारात नोकर होता. नंतर 1367 मध्ये, दख्खनमधील बहमनी सल्तनतची राजधानी म्हणून गुलबर्गा याच्या स्मरणार्थ मुहम्मद शाह याने जामा मशीद बांधली. 


1509 पर्यंत सल्तनत टिकून राहिली जेव्हा ती विजयनगर साम्राज्याने पराभूत होऊन नष्ट केली.


कसे जाल:-


शहराच्या मध्यभागी हलबर्गा परिसरातील गुलबर्गा किल्ल्याच्या परिसरात फक्त 2 किमी अंतरावर आहे. मशिदीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 7 मिनिटे लागतात. गुलबर्गा येथे जाण्यासाठी खाजगी आणि सरकारी दोन्ही बसेस उपलब्ध आहेत.


रेल्वे सेवा:-


गुलबर्गा रेल्वे स्टेशन हे मुंबई-हैद्राबाद-मद्रास-बंगलोर मार्गावरील मध्य रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या बहुतांश गाड्या ह्या स्थानकावर थांबतात. 


सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कलबुर्गी जंक्शन रेल्वे स्टेशन आहे जे 4.5 किमी अंतरावर आहे. तिथून मशिदीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 15 मिनिटे लागतात.


विमान सेवा:-


सर्वात जवळचे प्रमुख विमानतळ केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगलोर आहे.


रस्ता सेवा:-

गुलबर्गा शहर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांनी जोडलेले आहे.




 हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.



share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..



अस्वीकरण (Disclaimer ): 


आमच्या ब्लॉग मधील वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही. त्या गूगल इमेज, फोटोलिया, यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर ब्लॉग मध्ये कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती मेल करु शकते किंवा प्रतिमांचे श्रेय कोणालाही देऊ शकते.









48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश

    || श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...