संपुर्ण भारत पर्यटन माहिती मराठी ,भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती मराठी, सुंदर भारतीय पर्यटन स्थळे माहिती मराठी.
माझी ब्लॉग सूची
सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१
लढाख | Ladhakh "Buddha Land"
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
शिर्डी | Maharashtra "Unlimited"
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१
औरंगाबाद |Maharashtra "Unlimited"
रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
शनी शिंगणापूर | Maharashtra "Unlimited"
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.
पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१
कोल्हापूर | "जगात भारी आम्ही कोल्हापुरी" |Maharashtra "Unlimited"
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे श्री अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर, नरसिंह वाडी मंदिर, शिलाहार राजांच्या काळातील प्राचीन असे खिद्रापूर मंदिर यासह अनेक प्राचीन मंदिरे आहेत.
कोल्हापूरची ओळख छत्रपती राजर्षी शाहूंची नगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर, कुस्ती पंढरी, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल, रंकाळा तलाव व खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणारा तांबडा पांढरा रस्सा अशी आहे यामुळे पर्यटक दरवर्षी कोल्हापूरला भेट देतात.
कोल्हापूरची खाद्यसंस्कृती:-
कोल्हापूर हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून मिसळ ला ओळखले जाते. कोल्हापूरची मिसळ ही अत्यंत चटकदार व रुचकर मानली जाते. तसेच कोल्हापूरची भेळही प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर हे नाव घेतले असता मांसाहारी पदार्थ डोळ्यासमोर येतात. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा व सुके मटण, यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर या शहराची ओळख धारोष्ण दुधासाठी केली जाते. कोल्हापूर मध्ये अनेक दूध कट्टे असून ग्राहका समोरच काढण्यात येणारे म्हशीचे धारोष्ण दूध पिण्यासाठी दूध कट्ट्यावर पहाटेपासून लोक गर्दी करतात.
कोल्हापूरचा पिवळा धमक गुळ व कोल्हापुरी मसाले हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. भारतातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये व्हेज कोल्हापुरी व कोल्हापुरी चिकन मिळत
पर्यटन स्थळे:-
पन्हाळा किल्ला
मोठ्या किल्ल्यांपैकी एक म्हणून पन्हाळा किल्ला ओळखला जातो. सह्याद्री पर्वत रांगा मध्ये असलेला किल्ला सात किलोमीटर लांबीच्या तटबंदी ने वेढलेला असून या किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. पन्हाळा किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकाच्या शेवटी भोजराजा यांनी केली असे मानले जाते. पन्हाळा किल्ल्यामध्ये अनेक प्राचीन वास्तु व रचना पाहायला मिळतात. या किल्ल्यावर अनेक शासकांनी राज्य केले. आजही या किल्ल्याची तटबंदी व आतील वास्तू सुस्थितीत आहेत.
महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे प्राचीन असे हेमाडपंथी वास्तु रचनेचे काळ्याभोर दगडातील मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. हे मंदिर भाविकांसाठी सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत खुले असते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना व घंटा आहे. तसेच मंदिर परिसरातील अनेक दगडी चौथरे व त्यावरील कोरीवकाम प्रेक्षणीय आहे .
नवरात्रीच्या काळातील या मंदिराची रोषणाई अत्यंत अप्रतिम असते. किरणोत्सव हा या मंदिराचा प्रमुख उत्सव मानला जातो. करवीरनिवासिनी अंबाबाई चे मंदिर कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. रिक्षा व सिटी बसच्या द्वारे आपण मंदिरापर्यंत सहज जाऊ शकतो.
रंकाळा तलाव
महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेला रंकाळा तलाव आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी व करमणुकीसाठी हा तलाव लोकप्रिय आहे. रंकाळा तलाव छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला असून या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. रंकाळ्याच्या पश्चिम बाजूला शालिनी पॅलेस हे महाराष्ट्रातील तारांकित हॉटेल आहे. पूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर मधील रंकाळा तलाव परिसरांमध्ये होत असे.
दख्खनचा राजा
दख्खनचा राजा असा लौकिक असणारे कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्थान आहे. डोंगरावर असलेले हे स्थळ वाडी रत्नागिरी म्हणून हे स्थळ प्रसिद्ध असून येथे श्री ज्योतिबा देवाचे हेमाडपंथी काळ्या दगडातील मंदिर प्रसिद्ध आहे. या मन्दिराबरोबरच येथील केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरेही प्रसिद्ध आहेत.ज्योतिबाच्या सासन काठ्या प्रसिद्ध आहेत. या मंदिरामध्ये पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात. ज्योतिबा मंदिर कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे.
नृसिंहवाडी मंदिर
जिल्ह्यातील नरसोबाची वाडी दत्ताची वाडी म्हणूनही ओळखली जाते. शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर असणारे श्री दत्ताचे पाचशे ते आठशे वर्षाचे पुरातन असे हे श्री नरसिंह सरस्वती यांचे या ठिकाणी तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात वास्तव्य होते.
त्यांना श्री दत्ताचा अवतार मानले जात असे. या मंदिराच्या पायऱ्या नदीपात्रात आहेत. नरसिंह वाडी हे कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावर असून कोल्हापूर मधून राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बसेस नृसिंहवाडी मिळतात.
श्री क्षेत्र बाहुबली
जिल्ह्यातील बाहुबली हे तीर्थक्षेत्र अत्यंत प्रसिद्ध असून जैन धर्मातील पवित्र तीर्थस्थळ म्हणून याचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी भगवान श्री बाहुबली यांची 28 फुटी संगमरवरी भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते.
तसेच या मूर्ती सभोवताली जैन धर्मातील तीर्थंकरां ची लहान लहान चोवीस मंदिरे आहेत. दर बारा वर्षातून एकदा या ठिकाणी श्री बाहुबली यांचा महामस्तकाभिषेक होतो. बाहुबली या ठिकाणी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण दिले जाते. हा परिसर कमालीचा स्वच्छ व निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या मंदिराच्या जवळच दुर्गामातेचे पुरातन मंदिर आहे. बाहुबली जवळच नव्याने बांधण्यात आलेले जहाज मंदिर असून मैसूरचे वृंदावन गार्डन च्या धरतीवर संगीत कारंजे इथे पाहायला मिळतात.
दाजीपुर अभयारण्य
निसर्ग व पर्यावरण प्रेमींसाठी कोल्हापूरचे दाजीपुर अभयारण्य खूप खास आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या काळात शिकारी साठी प्रसिद्ध असणारे हे जंगल सन १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.
या अभयारण्यात वाघ, बिबट्या, रानगवा, चित्ता, अस्वल,हरीण असे अनेक जंगली प्राणी पाहता येतात. या अभयारण्यामध्ये जंगली गवा हा प्राणी मोठ्या संख्येने आढळतो म्हणून याला गवा अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
गगन बावडा
पंचावन्न किलोमीटर अंतरावरील गगनबावडा हे पश्चिम घाट व कोकणाच्या दरम्यान असणारे एक महत्त्वाचे स्थळ आहे. ब्रिटिश काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा गगनबावडा निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांची साठी प्रसिद्ध आहे.
कोकणामध्ये उतरणारे कुरुळ घाट आणि भुईबावडा घाट हे प्रसिद्ध आहेत. तसेच या शहरांमध्ये अनेक मंदिरे असून पांडवकालीन गुहा आहेत.
रामतीर्थ धबधबा
आजरा तालुक्यामध्ये असणारा रामतीर्थ धबधबा अत्यंत प्रसिद्ध आहे. हिरण्यकेशी नदी वर असणारा हा धबधबा नैसर्गिक धबधबा असून शांत आणि सुंदर निसर्गा साठी प्रसिद्ध आहे.
कणेरी मठ
कोल्हापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व ग्रामीण जीवनाची झलक पाहण्यासाठी पर्यटक कणेरी येथील सिद्धगिरी संग्रहालयाला भेट देतात. या संग्रहालयामध्ये प्राचीन ग्रामीण जीवनाची झलक पाहता येते. सात एकरामध्ये पसरलेल्या या संग्रहालयामध्ये अनेक ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे देखावे आहेत.
भवानी मंडप
कोल्हापूर शहरामध्ये असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असणारा भवानी मंडप छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या काळातील दरबार आणि महालाचा एक भाग होता. भवानी मंडप हा आता स्मारक म्हणून घोषित केला आहे. या मंडपामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती,त्यांचे लाकडी सिंहासन इत्यादी गोष्टी या ठिकाणी पाहता येतात.
न्यू पॅलेस
न्यू पॅलेस ही भवानी मंडप कसबा बावडा मार्गावरील इमारत पर्यटकांचे मन वेधून घेते आठ कोण असणाऱ्या असणारी ही इमारत असून या इमारती भोवती बुरुज आहेत या ठिकाणी प्राणीसंग्रहालय व भाग असून न्यू पॅलेस च्या आतील भागात छत्रपती शाहू महाराजांच्या वस्तू संग्रालय रूपात जपून ठेवलेले आहेत .
खिद्रापूरचे कोपेश्वर
शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केला आहे.
विशाळगड, पारगड
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. चिरेबंदी पायऱ्या, डोंगरदऱ्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्टय आहे.
टाऊन हॉल म्युझियम
कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय आहे. या ठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती आहेत . बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.
शालिनी पॅलेस
कोल्हापुरातील रमणीय रंकाळा तलावाच्या काठावरील शालिनी पॅलेस म्हणजे कोल्हापुरातील भव्य खुण. छत्रपती शहाजी द्वितीय पूर महाराज आणि राणी प्रमिला राजे यांची कन्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्यानंतर या वारसा रचनेला नाव देण्यात आले आहे. हि भव्य इमारत बागांसह १२ एकरांत पसरलेलीआहे आणि १९३१ ते १९३४ दरम्यान या इमारतीचे बांधकाम केलेले आहे .
काळा दगड आणि इटालियन संगमरवरी इमारतीला काचेच्या कमानी, लाकडी दारे आणि खिडक्या, एक प्रचंड घड्याळ असलेला मनोरा, बेल्जियमची काच इत्यादींनी सुशोभित केलेले हे १९८७ मध्ये त्रितारांकित हॉटेलमध्ये रुपांतरित झालेले महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव हेरिटेज आलिशान हॉटेल बनले.
थंड हवेची ठिकाणे
शाहूवाडी तालुक्यातील आंबा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आंबा घाट, जंगल, जैव विविधता, औषधी वनस्पती, अधिक पावसाचा भाग, झरे, धबधबे, प्रसन्न वातावरण हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच ऋतुत भेट देण्यासारखे ठिकाण आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे.
आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यासह विविध ठिकाणी छोटी छोटी वास्तुकलेची मंदिरे आहेत. कोल्हापूरपासून ८५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
काय खरेदी कराल
कोल्हापूरला आलेले पर्यटक कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी गुळा बरोबरच कोल्हापुरी फेटा, कोल्हापुरी लवंगी मिरची, चपलाहार, लक्ष्मीहार यांचीही खरेदी करतात. कोल्हापूरचे गांधी मार्केट कापड साठी प्रसिध्द आहे.
कालावधी :- जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना वर्षभरात कधीही कोल्हापूरची भटकंती करता येते.
कसे जाल:-
विमान:-
येथे विमानतळ असून कोल्हापूर साठी नियमित विमानसेवा उपलब्ध नाही.कोल्हापूर साठी सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गोवा राज्यातील दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून पुणे विमानतळ कोल्हापूर पासून दोनशे चाळीस किलोमीटर अंतरावर तर गोवा विमानतळ कोल्हापूर पासून 221 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे:-
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशनआहे. मुंबई नागपुर पुणे तिरुपती या शहरातून कोल्हापूर साठी दररोज रेल्वेसेवा उपलब्ध आहे.स्टेशन वरून परिसरातील सर्व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी टॅक्सी व खाजगी मोटारी सहज मिळतात.
रस्ता मार्ग:-
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग या शहरातून जातो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून काही तासांमध्ये या शहराला भेट देता येते. तसेच गोवा, बंगळुरू, हैदराबाद, तिरुपती, नागपूर ,औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी ,सातारा, सांगली या शहरातून कोल्हापूर साठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियमित मिळतात
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१
खजुराहो | Khajuraho
मध्यप्रदेश राज्यातील छत्रपूर जिल्ह्यांमधील हे शहर काम शिल्प साठी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये याचं नाव सामील आहे.
खजुराहो मंदिर प्रामुख्याने हिंदू आणि जैन मंदिरांचा संग्रह आहे ही सर्व मंदिरे प्राचीन असून चंदेल राजवंशाच्या काळामध्ये तयार केलेली आहेत त्यांची निर्मिती साधारणपणे 950 ते 1050 या काळामध्ये झाली होती प्राचीन काळामध्ये खजुराहोला खजूर पुरा या नावाने ओळखले जायचे.
खजुराहो मधील प्रमुख मंदिरे :
खजुराहो मध्ये एकूण ८५ मंदिरे आहेत.त्यापैकी काही मंदिरे खूपच प्रसिध्द असून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ठ आहेत.
लक्ष्मण मंदिर
खजुराहो मधील लक्ष्मण मंदिर हे द्वितीय क्रमांकाचे मंदिर आहे.आकाराने विशाल असलेले हे मंदिर विष्णू या देवाला समर्पित आहे.
चित्रगुप्त मंदिर
चित्रगुप्त मंदिर हे खजुराहो मधील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.सुर्यदेवाला समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात करण्यात आली होती.या मंदिरात सात घोड्यांच्या रथावर स्वार असलेली सूर्यदेवाची मूर्ती खूप आकर्षक आहे.
३) कंदरिया महादेव मंदिर
कंदरिया महादेव मंदिर हे खजुराहो मधील आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे.या मंदिराची निर्मिती नवव्या शतकात झाली आहे. भगवान शंकराचे हे मंदिर खूप लोकप्रिय आहे.भगवान शंकराचे एक नाव कंदर्पी वरून अपभ्रंश होऊन या मंदिराचे नाव कंदरिया पडले असावे असे मानले जाते.
पर्यटनासाठी योग्य काळ:- कधीही जाऊ शकता.पावसाळ्याच्या दिवसात इथे मध्यम प्रकारचा पाउस पडतो.पर्यटनासाठी सर्वात योग्य काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे.
कसे जावे:-
रेल्वे:-
खजुराहो ला रेल्वे स्टेशन असून दिल्ली किंवा मुंबई वरून रेल्वेने खजुराहो ला सहजपणे जाऊ शकतो. दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन स्टेशन वरून खजुराहो साठी नियमित ट्रेन उपलब्ध असते.खजुराहो पासून जवळचे मोठे रेल्वे स्टेशन हरपालपूर असून ९० कि.मी.अंतरावर आहे. आग्रा,कानपूर,भोपाल,झांसी,वाराणसी उदयपुर या शहरांशी खजुराहो नियमित ट्रेन द्वारे जोडले गेले आहे.
विमान:-
खजुराहो इथे विमानतळ असून शहरापासून ६ कि.मी.अंतरावर आहे. हा विमानतळ लहान असल्याने देशाच्या इतर शहरांशी थेट विमानसेवा उपलब्ध नाही.मात्र दिल्ली आणि वाराणसी हून दररोज विमानसेवा खजुराहो साठी उपलब्ध असते.विमानतळाच्या बाहेरच रिक्षा व बसेस मिळतात.
रस्ता मार्ग:-
मध्य प्रदेशातील प्रमुख शहरातून खजुराहो साठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.तसेच खजुराहो हे राष्ट्रीय महामार्ग ३९ वरील ठिकाण असल्याने रस्ता मार्गाने देशातील प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.रस्ता मार्गाने खजुराहो ला जाणे हे अधिक आरामदायी व वेळेची बचत होते
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.share करा,like करा.. comment करा.
पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!.
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
बदामी | Badami
बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडवणार्या गुंफा आहे. नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती, अर्धनारीनटेश्वराचं शिल्प, हरीहर, महिषासूरमर्दिनी, विष्णुचे दशावतार, पद्मपाणी बुद्धाचं शिल्प...डोळ्यांचं पारणं फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत. लाल वालुकाश्मामध्ये खोदलेल्या आहेत.
भूतनाथ मंदिर
संध्याकाळी सूर्याची किरणं इथल्या अगस्त्यतीर्थाच्या पाण्यावर पडून या तळ्याला सोनेरी रंगात उजळवून टाकतात. मंदिराचं सुरूवातीचं बांधकाम चालुक्यकालीन असलं तरी मंदिराचं शिखर कदंबकालीन आहे. मागच्या बाजूला प्राचीन जैन गुंफा आहेत. ज्यामध्ये जैन तीर्थंकर पार्श्वनाथांची प्रतिमा आहे.
यल्लमादेवीचं मंदिर
हे मंदिर विष्णूचं होतं. नंतर तिथे पार्वतीचाच अवतार मानल्या जाणार्या यल्लमादेवीची स्थापना करण्यात आली. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. चारही बाजूंनी मंदिरात प्रवेश करु शकता.बदामीमधली दोन शिवालयंही अत्यंत सुंदर आहेत.
गुंफा क्रमांक १
ही गुंफा नटराज स्वरूपातील शिवाच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. १८ हातांची ही मूर्ती १८ नाट्यमुद्रा दर्शविते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला त्रिदंडधारी शिवद्वारपाल असून, बाजूला हत्ती व बैलाचे शिल्प आहे. आत आल्यावर हरिहराची साडेसात फूट उंचीची मूर्ती दिसते. उजवीकडे, भिंतीच्या दिशेने शिव आणि पार्वतीचे अर्धनारीश्वरी रूपाचे शिल्प आहे. पंख असलेली अप्सरा, तलवारधारी यक्ष अशी अनेक शिल्पे येथे पाहायला मिळतात. सर्व शिल्पे अलंकारांनी सुशोभित केलेली आहेत. येथे पशु-पक्ष्यांची शिल्पे आहेत, तसेच मिथुनशिल्पेही आहेत.
गुंफा क्रमांक २
विष्णूला समर्पित असलेली ही गुंफा सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात खोदण्यात आली. प्रवेशद्वारावर विनाशस्त्र द्वारपाल आहेत. त्यांच्या हातात फुले आहेत. मंदिराच्या आत भागवत पुराणासारख्या हिंदू ग्रंथांमधील कथा दर्शविल्या आहेत. सातव्या शतकातील भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शविणारी ही गुंफा आहे. समुद्रमंथन, कृष्णजन्म आणि कृष्णलीला यात दाखविल्या आहेत. छतावरील आणि दरवाजाच्या वरील शिलाखंडामध्ये लक्ष्मी, स्वस्तिक प्रतीक, उडणारी जोडपी, ब्रह्मा, विष्णू आदींच्या प्रतिमा आहेत. छताला चौरस फ्रेममध्ये एका चक्रावर सोळा मासे दिसून येतात. शेवटच्या भागामध्ये आकाशात विहार करणारे एक जोडपे आणि गरुडावर विष्णु आहे. साधारणतः वेरूळसारखीच शिल्पकला येथे पाहायला मिळते. देव-देवता, त्यांचे अवतार, पौराणिक संदर्भ येथे दिसून येतात.
गुंफा क्रमांक ३
ही गुंफाही श्री विष्णूला समर्पित आहे. या समूहातील ही सर्वांत मोठी गुंफा आहे. या गुंफेत त्रिविक्रम, अनंतसायण, वासुदेव, वराह, हरिहर आणि नरसिंहाच्या विशाल मूर्तींचा आणि राक्षसांच्या मूर्तीचाही समावेश आहे. येथे फ्रेस्को पेंटिंगही दिसून येते; मात्र ही चित्रे थोडी फिकट झाली आहेत. परंतु त्या काळी असलेल्या चित्रकलेचा नमुनाही येथे पाहायला मिळतो. सहाव्या शतकातील संस्कृती, सौंदर्यप्रसाधने आणि कपड्यांचे दृष्टिकोन या गोष्टी गुहेतील शिल्पकलेतून दिसून येतात. अनेक स्तंभांच्या खांबावर, खांबांच्या चौकटीत स्त्री व पुरुष प्रेम मिथुनशिल्पे आहेत. शिलालेखावर ही गुंफा पौर्णिमेच्या दिवशी (एक नोव्हेंबर ५७८ रोजी) पूर्ण झाल्याचे दिसून येते
गुंफा क्रमांक ४
ही गुंफा जैन धर्मातील श्रेष्ठ तीर्थंकरांना समर्पित आहे. गुंफा क्रमांक तीनच्या पुढेच पूर्वेस ही गुंफा आहे. साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ही गुंफा तयार केली गेली असावी. त्यात अकराव्या व बाराव्या शतकातही सुधारणा झाल्या असाव्यात. महावीरांना यक्ष आणि अप्सरा चवऱ्या ढाळत आहेत, असेही शिल्प आहे. तसेच जैन तीर्थंकरांच्या २४ प्रतिमाही येथे आहेत. ही जैन गुंफा महाराष्ट्रामधील वेरूळ येथील जैन गुंफेप्रमाणेच दिसते. मस्तकावर पाच फणे असलेल्या पार्श्वनाथाची, तसेच सिंहावर आरूढ झालेली महावीराची मूर्तीही येथे आहे.
अन्य गुंफा : या गुहांच्या व्यतिरिक्त छोट्या गुंफाही येथे आहेत. त्या साधारणतः सातव्या व आठव्या शतकातील असून, यात बौद्ध गुंफांचाही समावेश आहे.
राहायची सोय:-बदामीमध्ये हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. होम स्टेचे काही पर्याय आहेत.
केव्हा जावे:मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही .
रेल्वे मार्ग: एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हंपी आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .(२) मिरज हुबळी एक्सप्रेस रोज(३)हुबळी ते मुंबईसाठीचालुक्य ए ११००६ /११०२२ ,शरावती एक्स ११०३६ ,शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बेळगाव, येथून बस सेवा उपलब्ध आहेत. हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात . आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात .
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१
हंपी | Hampi
हम्पी हे नाव पंपा क्षेत्र या नावावरून पडले आहे.हे ठिकाण रामायण काळात किष्किंधा क्षेत्र म्हणून ओळखले जाई.वानरराज सुग्रीवाची राजधानी या ठिकाणी होती.मध्ययुगात हे विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा म्हणूनही ओळखले जात होते.
इसवी सन १३४३ ते १५६५ च्या दरम्यान विजयनगर या हिंदू साम्राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी होती.राजा कृष्णदेवराय हा सम्राट असतानाचा काळ हम्पी चा सुवर्णकाळ होता.या काळात हम्पी मध्ये अनेक मंदिरे व भव्य प्रासाद बांधले गेले,दक्षिण भारतातील सर्वात बलशाली व समृद्ध राजवट म्हणूनही विजयनगर साम्राज्याला ओळखले जात.
प्रमुख ठिकाणे :
विरुपाक्ष मंदिर :
हम्पी मधील प्रमुख मंदिरांपैकी एक असलेले विरुपाक्ष मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. नक्षीकाम असलेली गोपुरे,दगडी सभामंडप व देव-देवतांच्या मूर्ती या मंदिराच्या भिंतींवर साकारण्यात आली आहे.वाहते.दरवर्षी डिसेंबर महिन्यात विरुपाक्ष व पम्पा यांच्या लग्नाचा समारोह आयोजित केला जातो.तसेच फेब्रुवारी महिन्यात विरुपाक्ष देवाचा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो.
विठ्ठल मंदिर :
हम्पी मधील विठ्ठल मंदिर हे श्री विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हम्पी मधील सर्व ऐतिहासिक स्मारकांमध्ये विठ्ठला मंदिर हे नितांतसुंदर स्मारक म्हणून ओळखले जाते.कारण या मंदिराच्या मुख्य कक्षातील ५६ दगडी खांबावर हाताने थाप मारली असता त्यातून सुमधुर संगीत ध्वनी बाहेर पडतात.
मंदिराच्या बाहेर प्रसिध्द असा दगडी रथ आहे.पन्नास रुपयांच्या नोटेवर आपणास त्याचे चित्र पाहायला मिळते.
हजाराराम मंदिर :
हजार राम मंदिर किंवा हजारा राम मंदिर हे हम्पी मधील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे.भगवान विष्णूला समर्पित असणाऱ्या या मंदिराची निर्मिती राजा कृष्णदेव राय यांनी केली असे मानले जाते.तत्कालीन राजांचे हे खाजगी मंदिर होते.संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या खांबांवर व भिंतींवर उत्तम दर्जाचे नक्षीकाम पाहायला मिळते.रामायणातील विविध प्रसंग इथल्या भिंतीवर साकारण्यात आले आहेत.
हत्ती अस्तबल :
हम्पी मधील हत्तीखाना विजयनगर साम्राज्याच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतिक आहे.हत्तींना ठेवण्यासाठी सुसज्ज असे कक्ष असणारी ही वास्तू आजही सुस्थितीत आहे.इथे हत्तींना ठेवले जाई,तसेच हत्तींच्या खाद्य व पाण्याची व्यवस्था इथे पाहायला मिळते.
राणीचे स्नानागार
राणीचे स्नानागार हे विजयनगर साम्राज्याच्या सुस्थितीतील अवशेषा पैकी एक आहे.आयताकार आकार असलेल्या या विहिरीत खाली उतरण्यासाठी सर्व बाजूंनी पायऱ्या आहेत.या पायऱ्यांची रचना या विहिरीचे सौंदर्य वाढवतात.या विहिरी पर्यंत नैसर्गिक उतार वापरून पाणी आणण्यात आले होते
लोटस महल :
हजारा राम मंदिरापासून जवळच असलेला लोटस महल अर्थात कमळ महाल हम्पीमधील सर्वात प्रसिध्द स्थळांपैकी एक आहे.वीट आणि चुन्यात बांधकाम केलेला हा महाल दोन मजली आहे.इंडो-इस्लामिक शैली असलेल्या या महालाचा आकार कमळाच्या फुला प्रमाणेच आहे
लक्ष्मी नरसिंह मंदिर
राजा कृष्णदेवराय यांच्या काळात बांधण्यात आलेले लक्ष्मी नरसिंह मंदिर हम्पी मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.विरुपाक्ष मंदिरापासून जवळच असलेले हे मंदिर भगवान विष्णू चा अवतार असलेल्या नरसिंहाला समर्पित आहे.अत्यंत मोठी व सुबक नक्षीकाम असलेली लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती ६.७ मीटर उंचीची असून विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे.
हम्पी बाजार :
हम्पी मधील विरुपाक्ष मंदिराला लागुनच हम्पी बाजार भरतो.पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे,कारण या बाजारात भेटवस्तू,बांगड्या,कलाकुसरीच्या वस्तू इत्यादींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.
कोरल राईड :
हम्पी हे स्थान तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे.हम्पी चा काही भाग नदीच्या पलीकडे आहे.या भागात जाण्यासाठी विरुपाक्ष मंदिराजवळच छोट्या नावा किंवा बांबू पासून तयार केलेल्या खोलगट कोराकॅल मधून पैलतीरावर जाता येते.
महानवमी डिब्बा
राजा कृष्णदेवराय यांच्या काळात तयार करण्यात आलेली ही वस्तू हम्पी मधील प्रमुख वास्तूंपैकी एक आहे.कृष्णदेवराय यांनी उदयगिरी (ओरिसा) वर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून महानवमी डिब्बा बांधून घेतला.
अंजनेय टेकडी
तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अंजनेय टेकडी असून बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान आहे,असे मानले जाते.या उंच टेकडीवर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
मातंग हिल
या टेकडी चा संदर्भ रामायणाशी जोडला जातो.रामायण काळात मतंग मुनी या ठिकाणी तपश्चर्या करत. हम्पीच्या मध्यवर्ती भागात असलेली व सर्वात उंच असलेल्या या टेकडी वरून हम्पी शहर व तुंगभद्रा नदीचे खोरे यांचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते.टेकडी माथ्यावर वीरभद्राचे मंदिर आहे.
अच्युतराय मंदिर
इ.स.१५३४ मध्ये बांधण्यात आलेले हे मंदिर भगवान विष्णूचा अवतार तिरुवेंगलानाथ यांस समर्पित आहे. मातंग टेकडी आणि गंधमदन टेकडी यांच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुख्य पर्यटन स्थळांपासून थोडेसे अलग असल्याने इथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते.
यानागुंडी गाव
हम्पीच्या पैलतीरावर असलेले यानागुंडी हे गाव विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे हलवण्यापूर्वी राजधानी म्हणून ओळखले जात होतेया गावाजवळच रामायण काळाशी नाते सांगणारे पंपा सरोवर,अंजनेयाद्री मंदिर,चान्द्रमौलीश्वर मंदिर,गगन महल,प्राचीन दगडी पूल इत्यादी प्राचीन स्थळे आहेत.
पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय
हम्पीच्या पासून जवळच असलेल्या कमलापुरा इथे पुरातत्वीय संग्रहालयाची इमारत आहे.हम्पी मध्ये उत्खननावेळी सापडलेल्या अनेक वस्तू,मुर्त्या,भांडी,अलंकार,शास्त्रे इत्यादी या संग्रहालयात पाहायला मिळतात.तसेच विजयनगर साम्राज्याची संपूर्ण माहिती चित्ररुपात या ठिकाणी पाहायला मिळते.हे संग्रहालय पाहिल्यानंतर हम्पी मधील वास्तूंबाबत अनेक बाबींची माहिती होते .
प्रसिध्द खाद्यपदार्थ :हम्पी मध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. उत्तर भागातील पर्यटन स्थळ असल्याने दक्षिण भारतीय पदार्थ जसे की,इडली डोसा असे पदार्थ नाष्ट्याला व दुपारी केळीच्या पानावरील जेवण ज्यामध्ये विविध कोशिंबिरी व भात यांचा समावेश असतो.हम्पी चा मुख्य भाग ऐतिहासिक क्षेत्राबरोबरच अध्यात्मिक क्षेत्र असल्याने येथे मांसाहारी जेवण मिळणे थोडे अवघड आहे.पण नदीपलीकडील भागात मांसाहारी पदार्थ सहज मिळतात.तसेच येथे चायनीज,इटालियन,थाई असे खाद्यपदार्थ ही मिळतात
कधी जाल:-
हम्पीला जाण्याचा सर्वात चांगला काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आहे कारण या काळात हम्पी मधील हवामान आल्हाददायी असते.
मार्च ते जून या काळात तापमान जास्त असल्याने दुपारची वेळ टाळून सकाळी व सायंकाळी केलेले पर्यटन सुखावह ठरते.
जून ते सप्टेबर या काळात आवर्जून हम्पीला जावे कारण हम्पी मध्ये क्वचितच मोठा पाऊस पडतो.
हम्पी मधील वार्षिक उत्सवाला हजेरी लावायची असेल तर दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विजया उत्सव तुमच्या साठी खास असेल.
कसे जावे:- कर्नाटक राज्यातील हम्पी हे प्रसिध्द असे पर्यटन स्थळ असल्याने देशाच्या सर्व भागाशी चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे.कर्नाटकच्या उत्तर भागात हम्पी असल्याने महाराष्ट्रातून कमी वेळात हम्पी ला जाता येते.हम्पी ला जाण्यासाठी तुम्ही विमान,रेल्वे किंवा बस/ मोटार या पर्यायांचा वापर करू शकता.
विमान: हम्पी साठी सर्वात जवळचा विमानतळ बेल्लारी या ठिकाणी असून फक्त ३५ कि.मी.अंतरावर आहे.हैद्राबाद व बंगुलुरू इथून बेल्लारी साठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे.
रेल्वेने :- रेल्वे स्टेशन होस्पेट या ठिकाणी असून १२ कि.मी.अंतरावर आहे.मुंबई-पुण्यावरून बंगुलुरू ला जाणाऱ्या रेल्वे होस्पेट स्थानकावर थांबतात.तसेच नागपूर वरून बंगळूरू ला जाणाऱ्या रेल्वेही होस्पेट ला थांबत
रस्ता मार्ग:- मुंबई,पुणे,कोल्हापूर इत्यादी शहरांशी महामार्गाने जोडले गेले आहे.मुंबई,पुणे,सातारा,कोल्हापूर या शहरातून हुबळी,गदग,बेल्लारीला जाणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या व खाजगी वोल्वो बसेस नियमित मिळतात. हम्पीचे अंतर (कोल्हापूर मार्गे) ५९६ कि.म.
विजयनगर साम्राज्याची ओळख करून घ्यायची असेल तर एकदा तरी हम्पी ला भेट दिलीच पाहिजे.
पर्यटनासाठी सायकल किंवा दुचाकी भाड्याने मिळतात.त्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे भटकंती करता
हा लेख कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा.
share करा,like करा.. comment करा.पुन्हा भेटू आणखी एका अश्याच वेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती घेऊन...धन्यवाद!!!!!..
अस्वीकरण (Disclaimer ):
आमच्या ब्लॉगमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही परवानाधारक सशुल्क प्रतिमांचे श्रेय आम्ही घेत नाही, मग त्या गूगल इमेजेस, फोटोलिया आणि शटरस्टॉक यांच्याकडून घेतलेल्या असतील. जर आमच्या ब्लॉगवर कोणतीही कॉपीराइट प्रतिमा वापरली गेली असेल तर संबंधित व्यक्ती एकतर आम्हाला प्रतिमा काढून टाकण्यासाठी थेट मेल करू शकते किंवा प्रतिमाचे श्रेय कोणालाही देऊ शकते.
48 . श्री ज्वाला देवी शक्तिपीठ | कांगडा, हिमाचल प्रदेश
|| श्री .ज्वाला देवी शक्तिपीठ || कांगडा, हिमाचल प्रदेश ज्वाला देवी मंदिर हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ज्वाला जी मंदिर हे भार...

-
महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे.समुद्रसपाटीपासून १३७२ मी उंचीवर सह्याद्री पर्वत रांगेच्या पश्चिम घाटातील ...
-
गोल घुमट ही भारतातील कर्नाटक राज्यातील विजापूर येथे स्थित एक ऐतिहासिक थडगी आहे. गोलघुमट हे मोहम्मद आदिल शाह, त्याची मैत्रीण रंभा आणि त्यां...
-
दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश भारताच्या पश्चिम किनार्याजवळ आहे आणि त्यात दोन वेगळे भाग आहेत. यापैकी दादरा हे गुजरात राज्याने वे...